Description
वातदोष म्हणजे काय? संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्पॉण्डिलायटिस, ऑस्टिओपोरोसिस, अर्धांगवात यांसारखे आजार आपल्याला जीवनाचा आनंद घेऊच देणार नाहीत का? या आजारातून मुक्तता कशी मिळवायची? यावर उपाय तरी काय आहेत? हे समजावून दिले आहे.
वय वाढू लागले, की प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर हालचालींवर मर्यादा पडू लागतात. शरीराला कंप येऊ लागतो. आपल्या गतिमान जीवनात अडथळा येतो. वय वाढले म्हणजे सुरकुत्या, कृशता, वेदना होणारच, असे म्हणून वातदोषाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आता तर आपल्या बदलत्या जीवनशैलीत काहींना तरूणपणातही वात असंतुलनाने त्रास होतो. या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासंबंधीचे मार्गदर्शन डॉ. तांबे यांनी या पुस्तकात केले आहे.

