Description
राणा जयसिंगाची स्वराज्यावर स्वारी, पुरंदरचे युध्द व त्यानंतर झालेला तह, शिवाजी महाराजांची आग्राभेट आणि पलायन हे सर्व प्रसंग शिवचरित्रातील अद्भुत घटना आहेत. या पुस्तकाच्या पूर्वार्धात राणा जयसिंगाची दक्षिणेत रवानगी ते पुरंदरचा तह आणि देशविभागणी बाबत तर उत्तरार्धात शिवाजी महाराजांची औरंगजेब भेट ते महाराज स्वराज्यात दाखल होण्यापर्यंतच संपुर्ण इतिहास तसेच आग्रा भेटीत खेळलेगेलेले राजकारण याबाबत मागोवा घेतलेला आहे. पावणेदोन-दोन वर्षांतील खासा शिवछत्रपतींनीच खेळलेल्या या राजकारणातील आदर्श इतिहासात क्वचितच सापडेल. औरंगजेबासारख्या अनुभवपूर्ण शत्रूला त्याच्या खुनी प्रवृत्तीला, संयमाला प्रवृत्त करणारे मनोधैर्य, युध्दचातुर्य, धाडसीपणा, आत्मविश्वास वैगरे असे कितीतरी शिवछत्रपतींचे गुण समजतात. पाने : २२३ ।

