Skip to product information
1 of 1

परीक्षेला पर्याय काय ? Ed. हेरंब कुलकर्णी

परीक्षेला पर्याय काय ? Ed. हेरंब कुलकर्णी

पास-नापासाचा शिक्का शालेय जीवनापासून आपल्यावर बसतो. काही वेळा नापासाचा शिक्का एखाद्याला जीवनातून उठवितो. दहावी-बारावीच्या परीक्षेत एखादा अनुत्तीर्ण झाला तर तो जीवनात काही करू शकत नाही, असे त्यावर बिंबवले जाते. यातूनच...

Regular price Rs. 252.00
Sale price Rs. 252.00 Regular price Rs. 280.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 252.00
View full details

पास-नापासाचा शिक्का शालेय जीवनापासून आपल्यावर बसतो. काही वेळा नापासाचा शिक्का एखाद्याला जीवनातून उठवितो. दहावी-बारावीच्या परीक्षेत एखादा अनुत्तीर्ण झाला तर तो जीवनात काही करू शकत नाही, असे त्यावर बिंबवले जाते. यातूनच मग विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतात. याचे कारण म्हणजे आपली परीक्षापद्धती. घोकंपट्टी करून परीक्षेत यशस्वी होणे हे सध्याच्या शिक्षण प्रक्रियेत अनिवार्य आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहण, आकलन शक्ती, कुवत, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने ही पद्धत प्रत्येकाच्या पचनी पडते असे नाही.

हे थांबविण्यासाठी काय करता येईल, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न व शिक्षण, परीक्षा, अभ्यासक्रम याचे मूल्यमापन ‘परीक्षेला पर्याय काय?’ यातून हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, साहित्यिक, कुलगुरू यांचे विचार, शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करणार्या शाळा, अनेक संस्थांचे अहवाल यांचा यात समावेश आहे.