Description
अशोक देशपांडे यांनी लिहिलेल्या या कादंबरीची नायिका आहे भारती ही तरुणी. नवऱ्याने छळ केल्यावर व फसवणूक केल्यावर घराबाहेर पडून स्वत:-चे साम्राज्य उभी करणारी ही तरुणी वाचकांच्या मनाचा ठाव घेते. स्त्रीमुक्तीचा किंवा स्त्रीशक्तीचा कुठेही प्रचारकी आव न आणता लेखकाने ही कादंबरी छान रंगवली आहे. सगळं हातातून गेल्यावर आलिशान अशा बंगल्यातून बाहेर पडलेली भारती पुन्हा सगळं वैभव मिळवते. या प्रवासात तिला मानवी स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. लेखकाने कथानकात अनेक बाबींवर सूचकपणे भाष्य केले आहे.

